काल World Intellectual Property Day, अर्थात जागतिक वैचारिक (बौद्धिक) मालमत्ता दिवस होता! आपण भारतीय आपल्या देशाला विद्वत्तेचे आगार समजतो, आमच्या सारखे आम्हीच अस फार गर्वाने म्हणतो मग, भूतकाळात विद्वत्तेच जागतिक किर्तीच केंद्र असणार्या आपल्या देशाची काय परिस्थिती आहे? सुमार दर्जाच शिक्षण, अशिक्षितता असे मुद्दे सांगून माझ्या प्रश्नच उत्तर मिळणार नाहीये त्यामुळे मीपण त्या वाटेला जाणार नाही. सरकार कुठे हि कोणाचही असो पण गेल्या काही वर्षात शिक्षणाचा टक्का निखलासपणे वाढला आहे. आभ्यास क्रमात होणारे नवे नवे बदल, शिक्षणात औषधापूरती का होईना पण प्रात्यक्षिकांवर आधारित मुल्ये आली आहेत. पण मग जगाचा मापदंडाने पहायचं ठरल तर मग पाहिजे तेवढे पेटंटसाठी अर्ज का जात नाहीत? ट्रेडमार्क, ट्रेड सिक्रेट, कॉपीराईट असल्या बाबींमध्ये आपण मागे का? खाली दिलेल्या माहिती तक्त्यामध्ये आपला क्रमाक शेवटचा का? जागतिक दर्जाच संशोधन, काव्य, संगीत, चित्रपट किवा ईतर गोष्टी आपण तयार करू शकत नाही अस तर नक्कीच नाही! पहा म्हणजे लोकसंख्येच्या आधारावर जगातला दुसरा मोठा देश आहोत! जगातली तिसरी सगळ्यात मोठी उच्चशिक्षण व्यवस्था (अमेरिका आणि चीन नंतरची) आपली आहे! २००१ च्या Census प्रमाणे भारतात एकूण ३७,६७०,१४७ पदवीधर आहेत! पैकी २,५८८,४०५ अभियांत्रिकी! गेल्या पंधरा वर्षात हा आकडा नक्कीच ३० लाखाच्या पुढे गेला असणार! मग आमच्या ‘जुगाडू’ डोक्यातून नव-नवीन कल्पना निघणे थांबलाय का काय? का त्या कल्पना ति स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठीची धमक आमच्यात कमी आहे? मुळात आजच्या शिक्षण व्यवस्थेला किवा परीक्षापाद्धतीला दोष देण्या ऐवजी मला अस म्हणायच आहे कि आजचा आपल्या भोवतालच्या Information Boom मध्ये आपल्याला ज्ञान मिळतंय का? आपल्याला आपल्या कल्पनाशक्तीला चालना द्यायला भाग पडणार काही आपल्या अभ्यासक्रमात आहे का? आज समाजासमोर बर्याच समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी लागणार सामाजिक भान विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हाव म्हणून आपली शिक्षण व्यवस्था काय प्रयत्न करते? का फक्त १०वी पर्यंत समाजसेवेचे ३ तास दर आठवड्याला घेऊन मुलांमध्ये जाणीव निर्माण होणारे? पुस्तकांचाही पलीकडे जाऊन Imagination, Creativity दाखवता येते हे आपण विद्यार्थ्यांना केव्हा सांगणार आहोत? लोक म्हणतात एखाद्या गोष्टीची Engineering Connections आम्हाला Discovery चेनेल वरून किंवा Google वर शोधून सहज मिळतील, अर्थातच! तुम्हाला माहिती मिळेल, पण माझा प्रश्न आहे ज्ञानाच काय? Information + Imagination + Practical + Realisation = Knowledge मग आपली गाडी Informationच्या पुढे केव्हा जाणार? प्रत्यक्षात एखादी गोष्ट माहित करून घेऊन मग त्यावर प्रात्याक्षिके करून त्यातून तुम्हाला त्या गोष्टीच ‘ज्ञान’ होण हि प्रक्रियाच आपल्या शिक्षण आणि परीक्षा पद्धतीनी खुडून टाकल्ये! मग आम्हीपण आमचा मुलांना टक्केवारीच्या शर्यतीत पळायला पाठवून देतो! ज्याला टक्के जास्त, ज्याला कविता तोंडपाठ तो हुशार पण त्या टक्केवारीचा प्रत्यक्षात काय उपयोग? टक्केवार फक्त दाखवते कि दिलेली माहिती तुमचा मुलगा किती टक्के लक्षात ठेऊ शकतो! पण जर त्या माहितीचा आधारावर नवनिर्मिती कशी करायची हेच त्यांना शिकवलं नाही तर काय होणार? नवनिर्मिती जाऊदे त्या साठवलेल्या माहितीचा प्रत्यक्षात उपयोग कसा करायचा हेच आम्हाला माहित नाही मग आमचा मेंदू हा फक्त माहितीच डम्पिंग ग्राउंड नाही का होणार!! हे प्रश्न आपण अनुत्तरीत सोडतो! मग मला अच्युत गोडबोलेंच वाक्य आठवत, “हजारो आईनस्टाईन अन न्यूटन आमच्या कडे भीक मागत फिरत आहेत” खर आहे ते! अन या सार्याचा दोष पण फक्त पालकांचा, शासनाचा किवा शासनकर्त्या पक्षाच्या पुढाऱ्यांचा आहे अस नाही! कायम मेकोलेच्या शिक्षण पद्धतीला दोष देण सोडून पुढे आम्ही एक सर्वांगी सर्व स्पर्शी विचार करायला आपण भारतीय म्हणून कमी पडलो हे आता कुठे तरी मान्य करून ह्या सार्यावर धर्म, पंथ, राजकीय आथवा वैचारिक मतभेद सोडून निदान पुढचा पिढ्यांना तरी पढतमुर्ख बनण्यापासून थांबवण्यासाठी याचा विचार व्हायला हवा हिचा अपेक्षा!
1 Comment
sumit
27/4/2016 06:05:41 pm
nice eshaanji…
Reply
Leave a Reply. |
Archives
January 2019
Categories
All
|