९ फेब्रुवारीला जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या घटनेने सारा देश ढवळून निघाला. सार्या देशात विद्यार्थ्यांनी रस्त्या-रस्त्यावर उरून JNU च्या तथाकथित विद्यार्थी नेत्यां विरुद्ध देशविरोधी घोषणा दिल्याबद्दल रोष व्यक्त केला. आज ऑगस्टचा महिना सुरु आहे, येत्या १५ तारखेला आपला स्वातंत्र्य दिन १५० वर्षांचा पारतंत्र्याचा शृंखला झुगारून आपला देश सार्वभौम आणि स्वतंत्र झाला तो मंगल दिवस. साहजिकच राष्ट्रभक्त विचाराचं विद्यार्थी संघटन असल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ह्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम आणि राष्ट्रभक्ती जागवणारे कार्यक्रम घेत असते. तसाच परिषदेच्या श्रीरामपूर शाखेने १५ ऑगस्टला तिरंगा पदयात्रेच आयोजन केला आहे. १०० मीटर लांबीचा तिरंगी ध्वज धरून ‘भारत माता कि जय’ आणि ‘वंदे मातरमच्या’ घोषात गावातून देशभक्तीपर वातावरणात १५०० विद्यार्थी पदयात्रा करत जातील असा कार्यक्रम आहे. आता असा कार्यक्रम म्हटल्यावर पोलीस प्रशासनाला कार्यक्रमाची परवानगी आणि बंदोबस्ताची विनंती करण हे क्रमप्राप्तच असत तसाच श्रीरामपूर शाखेच्या कार्यकर्त्यांनी केल. तर सन्माननीय पोलीस निरीक्षकांनी “आम्हाला त्या दिवशी अनेक कार्यक्रम असतात, तुम्हाला बंदोबस्त कसा देणार. गावत काही झाल तर जबाबदारी कोणाची. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे” असं सांगून,”वाटल्यास लेखी देतो पण परवानगी देता येणार नाही” अशी आडमुठी भूमिका घेतली आहे. चीड यावी अशी उत्तरे आणि 'आधी तुमचा गावात अनेक दंगे झाले आहेत पुन्हा काही झाल तर माझ्या नोकरीशी मी का खेळ करू' अशी यांची भाषा ऐकली कि चीड येते, वाटत आपण पाकिस्तानात आहोत कि काय? माझ्याच देशात माझ्याच देशाचा झेंडा अभिमानाने मिरवायला एवढे सरकारी उंबरठे झिजवावे लागावेत? अन मग प्रश्न पडतो कि स्वतःला देशभक्त विचाराचं म्हणवणार सरकार झोपी गेलय का काय? ठरल आहे तसच होणार, येत्या १५ ऑगस्टला ‘भारत मत कि जय’ चे नारे श्रीरामपुरात घुमणार आणि तिरंगा अभिमानाने गावातून लहरणार, मग कोण अडवतंय बघू!
0 Comments
Leave a Reply. |
AuthorLaw Student | Budding Writer | Reader |Activist @ABVPVoice & District Convener @ABVPNagar | Interested in Criminology & Science of Deduction | Blogs Personal Archives
September 2017
Categories
All
|