ऐन दिवाळीच्या तोंडावर दिल्लीतल्या फटाक्यांच्या विक्रीवर न्यायालयानं लादलेल्या बंदीचा विषय चघळला जातोय. एक कार्यकर्ता आणि एक नागरीक म्हणुन काही प्रश्नांना उत्तरं द्यावीत म्हणुन लेखन प्रपंच! प्रश्न १) तु नाही का फटाके उडवत? - लहानपणा पासुन आजोबांचा अस्थमा मुळे आमच्याकडे फटाके उडवत नाहीत, पण आजोळी गेल्यावर दिवाळीच्या सुट्टीत आतीशबाजीचे कमी धुराचे काही आणि बक्कळ टिकल्या बंदुका उडवायचो. सण साजरा करताना विेवेकबुद्धी आणि तारतम्य महत्वाचं! प्रश्न २) कोर्ट फक्त हिंदु सणांवरच का भाष्य करतं, हा कोर्टाचा पक्षपात नाही का? - नाही! मुळात कोर्टाचे हात कायद्यांनं बांधलेले आहेत, कोर्टासमोर जर कोणी जनहीतार्थ याचिका दाखल केली (हिंदु सणांविरुद्धच जास्ती होतात हे मान्य!) आणि त्यात व्यवस्थित मुद्देसुतपणे पुराने मांडले तर त्यावर कोर्टाला निर्णय घ्यावाच लागतो! अन फटाक्यांमुळे प्रदुषण होत नाही असं कोणाला वाटत असेल तर त्याच्याइतका मुर्ख तोच! आणि मुळात आत्ता कार्टाच्या फटाके बंदीचा विरोध करणारे कोणी वैज्ञानिक पद्धतीनं सर्वेक्षण करुन ख्रिस्ती नववर्षाच्या फटाक्यांनी होणार्या प्रदुषणावर किंवा ईदच्या कत्तलींवर शोध निबंध लिहीत नाही की जनहीथार्थ याचिका दाखल करत नाही! ती केली पुरेसा (उपलब्ध असेलेलाच!) पुरावा मुद्देसुतपणे मांडला तर तेव्हा पण कोर्ट बंदी घालेल! मग हे संविधानीक मार्ग न अवलंबता केलेला हा असहकार वांझोटा नव्हे का? त्यामुळे हा कोर्टाचा पक्षपात नाही तर इतर सणांबाबत इतका अभ्यास करायला आपण सक्षम नाही असं मला वाटतं! प्रश्न ३) मग होळीचं काय?? - धार्मिक उदाहरण देतो ‘उमा बटु संवाद:’ मधे बटुचा वेश घेतला शंकर, पार्वतीला कठोर तपश्चर्येनं शरीराला ताण देवु नकोस असं सांगतो त्याचं वाक्य आहे की ‘शरीर हा माणसाचा पहीला धर्म आहे!’ मग शरीर धर्मासाठी आवश्यक शुद्ध हवा, पुरेशी संसाधनं मिळणार नसतील तर आपले सण साजरेकरायच्या पद्धतीत कालानुरुप बदल व्हायला नको का? मग ९-९ फुटाची होळी प्रत्येक चौका-चौकात दहन करण्यापेक्षा ४-४गौर्यांची घरासमोर केली तरी त्यात मनातल्या होलिकेचं दहन होतंच की! प्रश्न ४) मग रंगपंचमीचं काय? -ती सुद्धा कोरड्या रंगानंखेळलेलीच बरी! कारण पुन्हा अनेक गावांना प्यायला पाणी नसताना आपल्याला उपलब्ध आहे म्हणुन ते वाया घालवण्यात काय सण? (मी या रंगपंचमीलाच फक्त कोरडे रंग खेळणार असं निक्षुन सांगीतलेलं पण इतर खेळणार्यांनी ‘जाउदे रे कुठं कोण तुला विचारतंय म्हणुन भिजवलेलं!!) प्रश्न ५) समजा उद्या कोणा उपटसुंभानं आमच्या दहन विधींवर प्रश्न उपस्थित केला तर काय करायचं? - मला तर वाटतं यावर सर्वांनी सावरकरांचे शब्द स्मरावेत की काळाच्या ओघात ज्या प्रथेचं महत्व बदलेल ती प्रथाच बदललेली बरी!! मग दहन संस्कारासाठी विद्युतदाहीनी आहेच. (पण या अटीवर की तीच्यासाठी वापरली जाणारी विज ही अपारंपारीक संसाधनं वापरुन निर्मिलेली असावी!) प्रश्न ६) मग त्या इदच्या कुर्बान्या, ख्रिस्ती नववर्षाचे फटाके, ख्रिसमसचे फटाके त्याचं काय? - प्रत्यक्ष संपुर्ण बंदी साठीच हा प्रयत्न आहे पण आपला अट्टाहास आपल्या सणांची बदनामी करतोय, हे कुठेतरी थांबायला हवं! आणि मुळात ही बाजु फार लंबे डायलॅाग न देतां कुठल्याही धार्मिक भावना न डिवचता वैज्ञानीक तर्कांनी उभारली पाहीजे! उगा ते मुके प्राणी मारतात म्हणायला अर्थ नाही देवीला बकरा कापुन गावाला नैवेद्य आपल्यातही असतो! बंदी हवी असेल तर नीट मुद्देसुत बाजु मांडली पाहीजे नुसता अट्टाहास का करायचा की ख्रिस्ती नववर्षाच्या फटाक्यांवर बंदी घाला मग दिवाळीचं बघु? बंदी गेली चुलीत आमची परंपरा किंवा कोण कोर्ट आम्हाला सांगणार उलट १०००ची नाही आता ५०००ची लड लावतो हे चुकीचं नाही का? आपल्या या फोल अस्मितेपाई दिवाळीचं मांगल्य जातय!
3 Comments
chaitanya saskar
10/10/2017 06:48:55 pm
I am agree with above few points
Reply
Sandeep marde
12/10/2017 09:25:51 pm
Khary
Reply
Ankit Kothawade
10/10/2017 07:35:14 pm
भाईसाहाब, इसी की प्रतीक्षा थी हमे ।
Reply
Leave a Reply. |
Archives
January 2019
Categories
All
|